सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी, रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग व त्यात आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हा अहवाल कुंटे यांनी तयारच केलेला नसून कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केलेला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणिदेवेंद्र फडणवीस,सचिव सीताराम कुंटे,फोन टॅपिंग,जितेंद्र आव्हाड,नवाब मलिक,देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना उत्तर दिलं आहे. अशी शंका घेणं हा सीताराम कुंटे यांचा अपमान आहे असं ते म्हणाले आहेत. किमान फडणवीसांनी हे तरी मान्य केलं की, आव्हाड अहवाल लिहू शकतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास
‘पोलिसांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू’
जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, 5 वर्षे ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं, ज्यांचं कुशाग्र बुद्धीसाठी कौतुक केलं जातं. अशा राजकीय धुरंधरानं राज्याच्या मुख्य सचिवाबद्दल अशी शंका व्यक्त करणं हा त्या मुख्य सचिवांचा, त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीचा आणि त्यांच्या आवाक्याचा अपमान आहे. पोलिसांचं तर खच्चीकरण झालं आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू आहे. आती सीताराम कुंटेंबद्दल आमच्या नावानं शंका उपस्थित करून त्यांना काय साध्य करायचं आहे ? परंतु हे तर आहे की, किमान फडणवीसांनी हे तरी मान्य केलं की, आव्हाड अहवाल लिहू शकतात. तेच खूप झालं.
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2021
सिताराम कुंटे यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा आणि त्यांच्या प्रामाणिक पणाचा या वाक्यातून अपमान झाला आहे. एकंदर पोलीस खात्यातील अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचं मनोबल खच्चीकरण करण्याच कामच जणू विरोधी पक्षाकडून सुरु आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2021
‘फडणवीस यांचा हा आरोप हास्यास्पद ‘
आपल्या आणखी एका ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी असंही म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांचा हा आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांनी एकापेक्षा जास्त ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे.
‘नवनीत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’
पण याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. कि जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात. एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खुप झालं.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2021
‘राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला तो त्यांनी तयारच केलेला नाही’- फडणवीस
दरम्यान या अहवालावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो. ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केलेला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी ? राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची ‘बंडखोरी’
पोलिस बदल्यांसंदर्भात मुख्य सचिवांनी तयार केलेला अहवाल, हा त्यांनी नाही तर कुण्या मंत्र्यांनी तयार केलेला दिसतो. कारण मी त्यांना ओळखतो.
या अहवालात ‘एखादा गुन्हा घडण्याची शक्यता असताना सुद्धा टॅपिंगची परवानगी असते‘, हा उल्लेख मुद्दाम वगळण्यात आला आहे. pic.twitter.com/zgyCOKthM8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 26, 2021
Rashmi Desai Hot Pics : रश्मी देसाईनं शेअर केले प्रचंड Bold फोटो !
पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट
‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं
API माधुरी मुंडेसह तिघांवर अॅन्टी करप्शनची मोठी कारवाई
‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’
पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती
Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही
काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे