मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावर गुरुवारी (दि.25) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी जोरदार टीका केली आहे. आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ही केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.
नाना पटोले nana patole म्हणाले, अंबानी आणि अदानीसाठी केंद्र सरकार काम करत आहे, असे सामान्य जनता बोलते. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांचीही चौकशी करायला पाहिजे. लोकशाहीत जनता सर्वात मोठी असते असे आम्ही मानतो. ते लोक मानतात की नाही माहित नाही, असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद
दवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना नाना पटोले nana patole म्हणाले, फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याही मंत्र्यावर आरोप झाले होते. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांचे राजीनामे घतले होते का ? फडणवीसांनी सर्वांनाच क्लिन चिट देत फिरत होते आणि तेच न्यायाधीश बनत होते, असा टोला पटोले यांनी लगावला. जर भाजपचे लोक दुधाने धुलेले असते तर त्यांना बोलण्याचा अधिकार होता, मात्र ते चिखलात फसलेले लोक आहेत, असा घणाघात पटोले यांनी केला.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा