मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले असतानाही मनसे प्रमुख राज ठाकरे विनामास्क वावरताना दिसतात. नुकतेच नाशिक दौ-यावर असतानाही त्यांनी मास्क घातला नव्हता. दरम्यान, राज ठाकरे यांनी मास्क न घालण्याचे कारण मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( ramdas athavale ) यांनी सांगून टाकले आहे. राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, असे आठवले म्हणाले. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी मास्क घालावेत, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. परंतु राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीत तसेच दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावेळीदेखील त्यांनी विनामास्क उपस्थिती लावली. अलीकडेच मराठी भाषा दिनाच्या आयोजित कार्यक्रमातही त्यांनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असे म्हणत उत्तर दिले होते. इतकच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही ठाकरेंनी मास्क घातला नव्हता.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत,
असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
- कोणी काही म्हणो, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा; कोकणातील ‘त्या’ प्रकल्पावरून राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र
- साहित्य संमेलन स्थगित : मे 2021 च्या आत संमेलन घ्या…ऑनलाइनला नकार