मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी सवाल उपस्थित केला आहे. ‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, असा प्रश्न केला.
केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर आता अनेक राजकीय घडामोडीही घडल्या. त्यावरून राज ठाकरे Raj Thackeray यांनी पत्रकार परिषद घेत आपले मत मांडले. त्यामध्ये ते म्हणाले, ‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही. परमबीर सिंग यांना 100 कोटींच्या टार्गेटची आठवण पोलिस कमिशनर पदावरुन हटवले गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? बार आणि रेस्टोरंटकडून 100 कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिले गेले हा आरोप लांच्छनास्पद आहे.’
अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत
तसेच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी? कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली? का ठेवली? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही. माझी विनंती आहे, की मुळ मुद्दा भरकटू देऊ नका, असेही ते म्हणाले.
‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’
जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन
‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’
‘ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?