नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने (central Government) देशातील गरीब लोक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक काही खास व्यवस्था केल्या आहेत. यासाठी मोदी सरकार Modi government आता काही विशेष योजना राबवत आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने त्यामधून चान्गले पैसे मिळणार आहे. या योजनेमुळे व्यक्तीचं वय झाल्याने म्हणजेच वृद्धापकाळाच्या काळात काळजी करण्याची आवश्यकता लागणार नाहीय. कारण त्या व्यक्तीला सहजतेने जीवन घालवता येईल. तर केंद्रातील असणाऱ्या ४ सरकारी योजनाबद्दल जाणून घ्या.
‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’
१ – अटल पेन्शन योजना :
देशातील कोणताही नागरिक अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Scheme) गुंतवणूक करू शकतो. या योजनेसाठी व्यक्तीकडे बँक खाते असणे आवश्यक . योजनेचा लाभ घेण्यासाठी वयवर्ष १८ ते ४० दरम्यान असणे आवश्यक. तसेच, अटल पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी लाभार्थ्याला किमान २० वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेंतर्गत किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त ५ हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. तर वयाच्या ६० व्या वर्षापासून व्यक्तीला या योजनेंतर्गत पेन्शन मिळू शकेल.
फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल
२ – पंतप्रधान श्रमयोगी मंदिर योजना :
केंद्र सरकारने ही पेन्शन योजना सन २०१९ रोजी सुरू केली. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सरकारकडून पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर तीन हजार रुपयांचे पेन्शन प्रति महिना देण्यात येते. अर्थात, व्यक्तीला वर्षानुवर्षे ३६ हजार रुपये मिळतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास ४३.७ लाख लोकांना या योजनेतून जोडले गेले आहे.
३ – पंतप्रधान किसान मानधन योजना :
समजा एक व्यक्ती शेतकरी आहे, तर त्याला वर्षाकाठी ३६ हजार रुपये मिळणार आहे हि एक सुवर्णसंधी आहे. मोदी सरकारकडून Modi government व्यक्तीला ही रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ देण्यात येऊ शकतो.
ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका
४ – प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Modi government यांनी सप्टेंबर २०१९ रोजी झारखंडमध्येच ही योजना सुरू केली आहे. ही प्रामुख्याने लहान व्यावसायिकांसाठी पेन्शन योजना आहे. लहान व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा हा उपक्रम राबवला आहे. त्याअंतर्गत ६० वर्षांच्या वयानंतर त्यांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण
Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा
मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी
राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता
Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट
Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’
देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’
सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस