सरकारसत्ता ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ड्रावरमधून 54 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी केला आहे. पाटलांच्या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) उत्तर दिले आहे. एखाद्याने शरद पवारांच्या (Sharad Pawar) ड्रॉवरमधून पत्र चोरल असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करण अन् चोरीचा माल विकत घेण हा फार मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरताना त्या काळोख्या खोलीत टार्चच्या प्रकाश मारण्यासाठी अजितदादासोबत भाजपाचे कोण कोण होते? याचाही खुलासा करावा असेही शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केली आहे. यावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायच आहे का, असे राणे यांनी म्हटले आहे.
Aaditya Thackeray | ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का ?, आदित्य ठाकरे म्हणाले…
संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायच होतं का ? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे.
संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करू नये.
अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला.
अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरल पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का ?
दुसर म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटमधून केली आहे.
संज्याने कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेला आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसर, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 8, 2021
Shivsena | शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्पष्टोक्ती ! म्हणाले – ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’
–
काय म्हटलं होत चंद्रकांत पाटलांनी ?
महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवारांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती.
कारण त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला.
आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार.
कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे. 14 महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून 54 आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात, अशी टीका पाटलांनी केली होती.
Devendra Fadnavis | ‘विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे'(Nilesh Rane)