सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) न्यायप्रिय आहेत. मिस्टर सत्यवादी आहेत. ते संजय राठोड प्रकरणात (Sanjay Rathod) न्याय करणारच असा विश्वास व्यक्त करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) वरून आक्रमक झालेल्या भाजप (Bharatiya Janata Party – BJP) वर पुन्हा एकदा टीका केली आहे.
भाजपनं संजय राठोड प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाचं अधिवेशन चालवू देणार नाही असा इशारा भाजपनं दिला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अधिवेशन व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अधिवेशन झालं पाहिजे. त्यातून प्रश्न मांडले गेले पाहिजेत. अनेक प्रश्न आहेत. शेतकरी, कष्टकरी, कोरोना याबद्दल विरोधकांना जे काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत तेही ते करू शकतात. परंतु अधिवेशन होऊ द्या. गोंधळ नको. अधिवेशन होऊच द्यायचं नाही या वाक्यातील जो च आहे तो लोकशाही विरोधी आहे असा टोलाही राऊतांनी यावेळी बोलताना लगावला.
पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) भाजपच्या महिला आघाडीकडून जे आंदोलन
सुरू आहे त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधानांनी सांगितलं की, आंदोलन करायचं नाही.
परंतु महाराष्ट्रात हा संदेश पोहोचलेला दिसत नाही.
विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. परंतु प्रत्येकानं आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत.
ज्या विषयाला घेऊन भाजपवाले आंदोलन करू इच्छितात, त्या विषयात मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री हे न्यायप्रिय आहेत.
मिस्टर सत्यवादी आहेत. ते या प्रकरणात नक्कीच न्याय करतील असा विश्वास आहे असं राऊत म्हणाले.