सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन: कोकणातील चिपी विमानतळावरून शिवसेना खासदार विनायक राऊत Vinayak Raut यांनी भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांना टोला लगावला. स्वत:ला कोकणसम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाचे कंत्राट आयआरबी कंपनीला देऊन वाट लावली, अशा शब्दांत टीका केली. तसेच चिपी विमानतळाचे काम एमआयडीसीला दिले असते तर शिर्डी विमानतळाप्रमाणे ते काम पूर्ण झाले असते, असेही ते म्हणाले.
विनायक राऊत Vinayak Raut हे सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘चिपी विमानतळाचे काम एमआयडीसीला दिले असते तर शिर्डी विमानतळाप्रमाणे ते आत्तापर्यंत पूर्णही झाले असते. मात्र, नारायण राणे यांनी हे कंत्राट आयआरबीला देऊन संपूर्ण प्रकल्पाची वाट लावली. त्यांनी दळभद्री आयआरबी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी चिपी विमानतळाचे कंत्राट त्यांना दिले. तसेच डीजीसीएच्या सुचनेप्रमाणे धावपट्टीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. आम्ही आयआरबी कंपनीला इशारा दिला आहे. काम पूर्ण झाले नाही तर एमआयडीसी चिपी विमानतळ प्रकल्पाचा ताबा घेईल.
15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात
दरम्यान, चिपी विमानतळाचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर या प्रकल्पाचा ताबा एमआयडीसी घेईल. मात्र, विमानतळाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही विनायक राऊत Vinayak Raut यांनी स्पष्ट केले. नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झाले होते. मात्र, आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले, असेही ते म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’
Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’
..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील
गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु
MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल
Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !