मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona in Maharashtra) वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या रुग्णसंख्येबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गंभीर इशारा दिला आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारचे (Maharashtra State Government) परिस्थितीवर लक्ष असल्याचं देखील ते म्हणाले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचे असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे,” त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, मागील कोरोनाच्या महामारीत लोकांचं हाल झालं आहे.
तिस-या कोरोनाच्या लाटेमुळे अनेक व्यवसायाचे देखील नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
मात्र आणखी कोरोनाच्या चौथ्या लाटेनं डोकं वर काढलं आहे की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on coronavirus cases in maharashtra