IMPIMP

Maharashtra Political Crisis | अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘तोपर्यंत सरकारला धोका…’

by nagesh
Pune Lok Sabha Bypoll Election | congress is upset because ncp leader ajit pawar claimed the pune lok sabha constituency

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच (Maharashtra Political Crisis) अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायलय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं असून त्याचदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मोठं विधान केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, ज्या दिवसांपासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण (Maharashtra Political Crisis) म्हणत होते की मे महिन्यात सुट्ट्या लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागले. त्यानुसार आता निकाल येत आहे, असे पवार म्हणाले.

 

 

पण कदाचित हे प्रकरण…

निकाल काहीही लागला तरी माझं स्वत:चं मत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. पण कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) हे प्रकरण पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला स्वत:ला वाटतं. मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की यासंदर्भात बहुतेक विधिमंडळातील ही बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्याक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असं अजित पवार म्हणाले.

 

 

तोपर्यंत सरकारला धोका…

अजित पवार पुढे म्हणाले, आत्याबाईला मिशा असत्या तर काय म्हटलं असतं अशा चर्चांना काय अर्थ आहे?
आजच्या घडीला त्यांच्याकडे 145 पेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे ते सरकार चालवतायत.
खूप जणांनी अशी वक्तव्य केली आहेत की घटनाबाह्य सरकार वगैरे. जरी म्हणायला तसं असलं तरी त्यांनी
अर्थसंकल्प (Budget) सादर केला आहेत. सरकार ते चावत आहेत. निर्णय ते घेत आहेत.
बहुमताने लोकशाहीत जो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळाला असतो त्या अधिकारांचा ते पुरेपुर
वापर करत आहेत. 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं
म्हणण्यात अर्थ नसल्याचे अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Maharashtra Political Crisis | supreme court verdict ajit-pawar reacts

 

हे देखील वाचा :

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती

Maharashtra Political Crisis | ‘आधी निकाल येऊ द्या, मग आपले ज्ञान पाजळा’- संजय शिरसाट

Drug Free Mumbai | ‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम ! अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

Related Posts