मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील (Water Supply Scheme) स्थगिती उठवण्याच्या मागणीवरुन बाळापूरचे
आमदार नितीन देशमुख (Balapur MLA Nitin Deshmukh) यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा गुरुवारी नागपूर
शहरात दाखल होणार होती. परंतु नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या यात्रेला वेशीवरच रोखलं आणि देशमुख यांच्यासह अनेक कार्य़कर्त्यांना
ताब्यात घेतले. या प्रकरणावरुन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis
Government) जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी यावरुन सरकारला लक्ष केलं
आहे. तसेच हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात असल्याचे अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी म्हटले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही (Democracy) संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. याचे जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक (Arrest) केली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावे की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब दिला जाईल, असा इशारा अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी दिला आहे.
मतदार संघात हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे बाळापुर मतदार संघाचे आमदार श्री नितीन देशमुख यांना बेकायदेशीर अटक करून हुकुमशाही सिद्ध करणाऱ्या सैतानी प्रवृत्तीचा जाहीर निषेध! याचे गंभीर परिणाम भविष्यात या सरकारला भोगावे लागतील.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 20, 2023
राज्यात नेमकं चाललंय काय?
याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास होण्याचं कारण काय? बळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचे जीवन संकटात आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर स्थगिती आणली.
नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागपूरला जात होते. मात्र सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणतय का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- MLA Amol Mitkari | amol mitkari criticized shinde fadnavis government after arrest nitin deshmukh