मुंबई : ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य सरकारचा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. या पुरस्कारानंतर विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनीही त्यांचे अभिनंदन केले. ‘मी आशाताईंचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला धन्यवाद देतो. त्यांची ही बातमी कायम स्मरणात राहील’, असे पवार म्हणाले.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आशाताईंचा आवाज जसा कायमचा स्मरणात राहील तशीच ही बातमीही कायम लक्षात राहील. @ashabhosle #महाराष्ट्रभूषण
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 25, 2021
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद
शरद पवार Sharad Pawar यांनी आशा भोसले यांचे ट्विट करून अभिनंदन केले. त्यामध्ये ते म्हणाले, ‘ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आशाताईंचा आवाज जसा कायमचा स्मरणात राहील तशीच ही बातमीही कायम लक्षात राहील. संगीताच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंबियांचे ऐतिहासिक योगदान आहे. सर्वच मंगेशकर बंधु-भगिनींनी या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. लता दीदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा अभिमान प्रत्येकाला आहे. तसाच अभिमान आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वांना वाटेल’.
संगीताच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंबियांचे ऐतिहासिक योगदान आहे. सर्वच मंगेशकर बंधु-भगिनींनी या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. लता दीदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा अभिमान प्रत्येकाला आहे, तसाच अभिमान आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वांना वाटेल.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 25, 2021
‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’
तसेच त्यांनी पुढे म्हटले, की आशाताई यांचा आवाज, त्यांची गाण्याची लकब, भावगीतांसाठी त्यांचे योगदान या सगळ्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या आहेत. मोठ्या झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही म्हणतात. लतादीदींसारख्या थोर व्यक्तींच्या भगिनी असल्याने आपले स्वतंत्र अस्तित्व तयार करणे अतिशय अवघड गोष्ट होती. पण आशाताईंनी अतिशय कष्ट घेऊन संगीत क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि या क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांना महाराष्ट्र सरकारने आज सन्मानित केलं ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी आशाताईंचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला धन्यवाद देतो’.
Also Read :
बेहिशेबी बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे, DNA चाचणीची प्रतिक्षा… जाणून घ्या NIA ने कोर्टात काय सांगितलं
Nana Patole : ‘पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनाम द्यायला सांगा आणि चौकशी करा’ !
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा
Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल
‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य