काय म्हणाले बंडातात्या ?
शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल.
त्यावेळी काही कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील.
… संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. pic.twitter.com/Gbf45dPqB2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 8, 2021
वाद निर्माण होण्याची शक्यता
कराडकर यांनी मांडलेली ही भूमिका केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठीची आहे.
त्यामुळे इतर सोहळ्यातील पालखी प्रमुख बंडातात्या कराडकरांच्या मागणीला पाठिंबा देणार का ? यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एकाच मार्गाने सर्व पालख्या नेल्या जाव्यात
दुसरीकडे सर्व पालखी सोहळे वेगवेगळ्या वाटेने जाणार असल्याने प्रशासनावर ताण येणार असेल तर सर्व पालख्या एकाच मार्गावरुन नेल्या जाव्यात.
असा ऐतिहासिक आणि धाडसी प्रस्ताव सोहळ्यातील मुख्य मानकरी राजा भाऊ चोपदारांनी मांडून शासना समोर आणखी एक पर्याय ठेवला आहे.
त्यामुळे आता सगळ्या प्रकरणी शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंडातात्यांनी घेतली फडणवीसांची भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीची आषाढी वारीसाठी (Ashadhi Vari) ‘बायो-बबल’ पद्धतीने अवलंब करीत काही निवडक वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधासह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी ट्विट करुन सांगितले.
Also Read:
Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले, जाणून घ्या आजचे नवे दर
Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
अॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’