मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : नोटाबंदीपासून निवडणुका असलेल्या राज्यात प्रथम लसीकरणाच्या आश्वासनापर्यंत, भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आहे. त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा झाली. केंद्र सरकारने कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा केली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी मोदी सरकारवर टीका केली.
केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ही कपात मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामध्ये सीतारमन म्हणाल्या होत्या की, ‘केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही. 2020-21 च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. केंद्र सरकारने छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय मागे घेतला आहे’.
From demonetisation to promising vaccines first in poll-bound states – every now and then @BJP4India likes to play a prank on the nation. Today it joked around with millions of depositors – maybe the past decisions were also an oversight with delight?#NationalJumlaDay https://t.co/fNvkUGtdCc
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 1, 2021
त्यानंतर आता जयंत पाटील Jayant Patil यांनी ट्विट करत टीका केली. ते म्हणाले, ‘नोटांबदीपासून निवडणुका असलेल्या राज्यात प्रथम लसीकरणाच्या आश्वासनापर्यंत भाजपचे सरकार देशातील जनतेची प्रत्येकवेळी थट्टा करत आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने थट्टा केली आहे’.
वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत
दरम्यान, यापूर्वी सुप्रिया सुळे यांनीही टीका केली. ‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढही तात्काळ मागे घ्यावी, असे म्हटले आहे.
IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर
निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !
Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’
खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण
‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…