सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये नाव आलेले शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अधिवेशनापूर्वीच राजीनामा देतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राठोड यांची कानउघडणी करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. मी निर्णय घेण्याआधी तू घे असं असं म्हणत मु्ख्यमंत्र्यांनी त्यांना सुनावलं आहे अशी माहिती आहे.
या प्रकरणामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे.
कारण महाविकास आघाडी सरकारची संजय राठोड यांच्यामुळं बदनामी होत आहे.
विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून सतत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
या सगळ्यामुळं सीएम ठाकरे नाराज आहेत.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून भाजप देखील आक्रमक झाली आहे.
त्यामुळं आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात संजय राठोड (Sanjay Rathod) हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.
त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे.
संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.
अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे.
मग हे सरकार कसली वाट पहात आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालूच देणार नाही असं भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.