IMPIMP

Vinayak Raut | ‘नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही’

by nagesh
Narayan Rane vs Vinayak Raut | shivsena leader and mp vinayak raut takes a dig at narayan rane and nitesh rane

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Vinayak Raut | नुकतंच केंद्राच्या मंत्रिमंडळ फेरबदलात महाराष्ट्रातील 4 जणांची मंत्रिपदावर वर्णी लागली. तर आता मोदी सरकारने या 4 मंत्र्यावर महाराष्ट्रातील जन आशीर्वाद यात्रेचं काम सोपवलं आहे. दरम्यान, भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून शिवसेना (Shiv Sena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच (Shiv Sena) आहे, तो भाजपने (BJP) चोरला आहे. असा आरोप करत नारायण राणेंच्या (Narayan Rane) सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा घणाघात देखील विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय म्हणाले विनायक राऊत?

शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंसह (Narayan Rane) भाजपवर जोरदार हॉलबॉल केला आहे. त्यावेळी एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, ‘जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच, भाजपने हा शब्द चोरला. राज्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले म्हणून भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली होती. आता 4 मंत्र्यांना घेऊन या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा राज्यातील ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘ जन आशीर्वाद यात्रेमुळे महाविकास आघाडी सरकारला टक्कर वगैरे काही
मिळणार नाही. यात्रा निघाली नाही निघाली तरी महाविकास आघाडी सरकार कायम रहाणार आहे. नारायण राणेंचा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा होत आहे. यावरून देखील त्यांनी निशाणा साधला आहे. नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे यापूर्वी वाभाडे काढले होते. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणातल्या सेनेची ताकद कमी होणार नाही, नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केलाय.

दरम्यान, नारायण राणेंना शिवसेनेनेच 2 वेळा पराभव दाखवून दिला आहे. नारायण राणे म्हणजे
पनवती, त्यांना भाजपने अनेक ठिकाणी फिरवावंच. त्यामुळे भाजपचीच ताकदच कमी होईल, असा चिमटा
देखील शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी काढला आहे.

 

Web Title : vinayak raut slams bjp over narayan ranes jan ashirwad yatra

 

हे देखील वाचा :

 

PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

Pune Crime | कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड यांना ‘मोक्का’ न्यायालयाकडून जामीन मंजूर

Parambir Singh Extortion Case | परमबीर सिंह वसूली केसमध्ये गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरूद्ध सुद्धा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts