सरकारसत्ता ऑनलाइन – Kirit Somaiya Vs Sanjay Raut | अलिबागमधील (Alibag) ज्या १९ बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) भरत आहेत. नेमके तेच बंगले कसे काय चोरीला गेले?, असा सवाल भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यावर बोलताना, सोमय्यांनी जे बंगले सांगितले ते अस्तित्त्वात नसल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. अशातच याबाबत कोलई गावचे सरपंच मिसाळ यांनी महत्त्वाचा खुलासा केला (Kirit Somaiya Vs Sanjay Raut) आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
कोलई गावात बंगले होते की नव्हते, त्यासोबतच बंगले १९ नाहीतर १८ होते. अन्वय नाईक (Anvay Naik) यांनी घेतलेल्या जागेवर १८ बंगले बांधलेले होते,
खरेदीनंतर त्यांनी हे बंगले पाडले त्यानंतर 2014 ला रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray)
आणि मनीषा वायकरांना (Manisha Vaikar) जागा विकली.
त्यामुळे पुर्वी बंगले असल्याने ठाकरेंनी टॅक्स भरल्याची माहिती गावचे सरपंच मिसाळ (Misal) यांनी दिली आहे.
त्यासोबतच त्यांनी सोमय्या यांचा दावा फेटाळून लावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, ते १९ बंगले हे ठाकरेंचे असून त्या बंगल्याचा टॅक्स हा रश्मी ठाकरे यांनी भरला आहे.
त्यामुळे आता राऊत कोणाला जोड्याने मारणार असा सवाल सोमय्यांनी (Kirit Somaiya Vs Sanjay Raut) केला होता.
मात्र सरपंचांनी दिलेल्या माहितीवर सोमय्या यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#Kirit Somaiya #Sanjay Raut #Rashmi Thackeray #BJP #Shivsena
Web Title :- Kirit Somaiya Vs Sanjay Raut | bjp leader kirit somaiya and shivsena MP sanjay raut dispute the sarpanch of korlai told a true lie about bunglows