IMPIMP

Ramdas Kadam | रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

by nagesh
Maharashtra Politics | ncp leader sanjay kadam will enter the thackeray group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षचिन्हाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, काँग्रेसची गाय-बछडा किंवा बैल-जोडी असुदे पक्ष फुटल्यानंतर निशाणी देताना निकष पाहिले तर एकनाथ शिंदेंना नक्की न्याय मिळेल. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब होईल, असं वाटतं. कारण, यावर निकाल देताना एकूण आमदार आणि खासदाराला मिळालेली मते मोजली जातात. तसेच, एकनाथ शिंदेबरोबर १३ खासदार आणि ५० आमदार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर ५ खासदार आणि १४ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं पाहिजे. असे मत यावेळी बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी व्यक्त केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाकरे कुटुंबावर टीका करताना रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे. जी काही अक्कल ती ठाकरेंनाच, आम्ही सगळे बेअक्कल आहोत. असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे कुटुंबावर केला. “बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी देव आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं, शून्यातन उभं केलं. शून्यातून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली. ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी झगडणारी शिवसेना’ या घोषवाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला जन्म दिला आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर मोठी केली. ती हिंदुत्ववादी शिवसेना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि सोनिया गांधींबरोबर गहाण ठेवली.” अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

 

“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनात बोलताना मान्य केलं की, शिवसेना ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार संपविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे देखील यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले. त्यांनी शिवसेना शरद पवारांकडे गहान ठेवली आहे. आम्ही भाजपात प्रवेश करू पण मरेपर्यंत भगवा झेंडा सोडणार नाही.” असा इशारा देखील यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाला दिला.

 

त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
ते म्हणाले, “संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करत आहेत.
त्यात ते जेवढे बोलत आहेत, तेवढा त्यांचा पक्ष कमी होत आहे.
त्यामुळे त्यांना किती गांभीर्याने घ्यायचे हे आता आपण ठरवायचे आहे.
सुप्रीम कोर्टातील निकाल आल्यावर उद्धव ठाकरेंना समजेल त्यांच्या जवळचे अनिल परब त्यांना किती
फसवत आहेत.” असा आरोप त्यांनी अनिल परब यांच्यावर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Ramdas Kadam | ramdas kadam attacks uddhav thackeray over shivsena dispute

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवार म्हणाले – ‘माझं स्पष्ट मत आहे, आत्ता जे घडत आहे त्याला…’

Pune NCP News | राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या स्वराज्य ते सुराज्य रॅलीला उत्तम प्रतिसाद

Johnson And Johnson Baby Powder | ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ प्रकरणात हायकोर्टाचा ‘एफडीए’ला दणका; कंपनीला बेबी पावडर विक्रीस परवानगी

 

Related Posts