सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – कर्नाटक आणि मध्य प्रदेशात काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (shivaji maharaj statue) हटवल्यामुळं मोठा वादंग निर्माण झाला होता. प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता पुतळा हटवल्यानं शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. हीच घटना आता लातूर जिल्ह्यात घडली आहे. माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकार निजामी सरकार असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.
‘कोणाचीही तक्रार नसताना महाराजांचा पुतळा काढून टाकला’
विधानसभेच्या सभागृहात बोलताना संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, ज्यांच्यामुळं महाराष्ट्र घडला आहे,
अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय विधानसभेत मांडू न देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे.
लातूरच्या रायवाडी येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गावकऱ्यांनी वर्गणी करून उभारला होता.
परंतु प्रशासनानं कोणाचीही याबाबत एकही तक्रार नसताना हा पुतळा काढून टाकला असं त्यांनी सांगितलं.
’15 दिवसात सरकारनं शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही, तर…’
पुढं बोलताना ते म्हणाले, ज्यावेळी कर्नाटकात अशा प्रकारे महाराजांचा पुतळा (shivaji maharaj statue) हटवला होता त्यावेळी सरकार सोबत आम्ही त्या ठिकाणी जाऊन छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवला.
मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवण्याचं काम या ठाकरे सरकारनं केलं आहे.
येत्या 15 दिवसात जर सरकारनं शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर लातूरसह संपूर्ण
मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही निलंगेकर यांनी यावेळी बोलताना दिला.