IMPIMP

Solapur Pune Highway Accident | दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या 3 मित्रांचा अपघातात मृत्यू, सोलापुर-पुणे महामार्गावरील घटना

by nagesh
Solapur Pune Highway Accident | 3 friends riding triple seat on two wheeler died in an accident, incident on Solapur-Pune highway

सरकारसत्ता ऑनलाईन – Solapur Pune Highway Accident | मित्राला पुण्याला सोडायला एकाच दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या तीन
तरूणांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी मध्यरात्री सोलापुर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णीजवळ (Tembhurni Accident News) घडली.
(Solapur Pune Highway Accident)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तेजस सुरेश इंडी ( वय 20), लिंगराज शिवानंद हाळके (24, दोघे ही राहणार भवानी पेठ, सोलापुर) आणि गणेश शरणाप्पा शेरी अशी मृतांची नावे आहेत. तेजस पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो रेल्वेने पुण्याला जाणार होता परंतू लिंगराज आणि गणेश यांनी तेजसला दुचाकीवरून सोडण्याचा निर्णय घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुरूवारी मध्यरात्री तीघेजण एकाच दुचाकीवरून ट्रिपल सिट निघाले होते. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास सोलापुर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, तेजस आणि लिंगराज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश ही गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व गणेशला तातडीने शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले.
तेथे उपराचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघात प्रकरणी किरण सुभाष इंडी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात
(Tembhurni Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :-  Solapur Pune Highway Accident | 3 friends riding triple seat on two wheeler died in an accident, incident on Solapur-Pune highway

 

हे देखील वाचा :

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar News | नंदुरबार, शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

Maharashtra Politics News | राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा दावा

 

Related Posts