पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काय देशाचे मालक आहेत का, प्रत्येक जण मालक आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर आहात. त्यांची चर्चा काय झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आला हे महत्त्वाचे आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी लगावला आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’
पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी सरकारच्या कठोर निर्बंधासह विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले. ते म्हणाले, इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकिकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहेत तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहेत. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप ‘कॉपी कॅट’ असल्याचा टोला त्यांनी लगावला.
परमबीर सिंग आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का ? पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनामास्क फोटो आहे. सरकार लॉकडाऊन बाबत वंचितसोबत बोलले नाहीत, बाकिच्यांशी काय बोलले माहित नाही. दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी हरकत नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !
परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार
‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार
पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित
आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’