मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर आता या प्रकरणात त्यांची पत्नी अमृता फडणवीस amrita fadnavis यांनीही उडी घेतली आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी वाझे यांचे नाव आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘एकीकडे नागपूरसारख्या शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze 👎
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 17, 2021
तसेच उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
आपल्या काही खास पंटराकडून योजना करत आहे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे यांची तुलना पंटराशी केली आहे.
अमृता फडणवीसांकडून सातत्याने टीका
अमृता फडणवीस amrita fadnavis यांनी यापूर्वीही अनेकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण असो किंवा कंगना राणावत प्रकरण त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला होता.
भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना सहाव्यांदा संसद महारत्न पुरस्कार !
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट, शवविच्छेदन अहवाल NIA कडे