रायगड : सरकारसत्ता ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. राज्यातील नेते अन् मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे, पण मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावरून sambhaji raje from raigad दिला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी यावेळी केली.
–
शिवराज्यभिषेक सोहळा रविवारी (दि. 6) रायगडावर उत्साहात साजरा झाला.
यावेळी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरून sambhaji raje from raigad मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आपली भूमिका स्पष्ट केली.
लढाई आपल्यामध्येच कशाला करायची, मी काही राजकारणी नाही, राजकारण करणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार नाही.
जर काही चुकल असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, दिशाभूल करण्याचे रक्त आमच्यात नाही, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणाचा लढा आपण लढत आहोत, काही लोकं नाराज झाले तरी चालतील.
कुणाचीही दिशाभूल करणार नाही.
पण आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे.
शिवाजीराजेंनी जे कार्य समाजासाठी केले होते. तेच आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. पण आता कोरोनाचे संकट असल्याने आपल्याला काहीच करता येत नाही. माझ काही चुकल असेल तर दिलीगिरी व्यक्त करतो, असे संभाजीराजे म्हणाले.
Also Read:-
‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील
पुण्यात आता घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात, शहरात पहिलाच प्रयोग
कोलकातामध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब