मुंबई : सध्या निलंबित असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी मोठं विधान केले आहे. ‘मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंग यांना निलंबित केले असते’, असे म्हणाले.
Devendra Fadnavis : ‘लवंगी होता तर ते एवढे घाबरले का?’
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या प्रकरणातील तपासात पोलिसांची चुका झाल्याचे सांगत निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले होते. त्यावर नाना पटोले Nana Patole म्हणाले, ‘मोहन डेलकर प्रकरणानंतर हे सगळे सुरु झाले. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरु नाही. आम्ही दबाव आणला. हे आयुक्त गुन्हे दाखल होणार नाही, असे सांगत होते. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्धतीने वागणारे अधिकारी असतील तर मी राहिलो असतो तर बदली केली नाहीतर निलंबितच केले असते. त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात जावे की उच्च न्यायालयात हा त्यांचा प्रश्न आहे’.
…तेव्हा फडणवीस न्यायाधीश व्हायचे
राजकारणात आरोप होत असतात. पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले तर ते क्लीनचिट देत होते. ते न्यायाधीश होते. त्यावेळी त्यांनी राजीनामा का नाही घेतला?, असा सवाल उपस्थित केला.
‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं !’
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठं वक्तव्य; म्हणाले…
प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’
फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल
‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला
Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव
‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका