IMPIMP

संजय राऊत BJP वर संतापले, म्हणाले- ‘निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा’

by pranjalishirish
Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut replied to devendra fadnavis over utpal parrikar candidature in goa election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात करोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात लसींचा तुटवडा भासत असल्याने आज राज्यातील काही लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यातच कोरोना लसीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधील नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. यावरुन खासदार संजय राऊत  Sanjay Raut यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रात जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहे. जगाच्या इतिहासात असं मी कधी पाहिलं नव्हतं. आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ?’, संजय राऊतांचा मराठी मंत्र्यांना सवाल

किमान 105 आमदारांसाठी लस घेऊन या

संजय राऊत Sanjay Raut पुढे म्हणाले, आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही, तुम्ही आणू नका. भाजपचे जे आमचे सहकारी आहेत, ते कालपर्यंत इथले राज्यकर्ते होते. त्यांचे देखील 105 आमदार या राज्यातील जनतेने निवडून दिले आहेत. त्याचे तरी भान ठेवून तुम्हाला निवडून दिलल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या, ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे ते कौतुकास्पद आहे, असा टोमणा राऊत यांनी मारला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र जेवढा आमचा आहे तेवढा तुमचा देखील आहे. महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे, कोणत्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी महाराष्ट्रावर नाही, असेही राऊत म्हणाले.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

टीकाकारांनी आपलं रक्त तपासावं

टीकाकारांनी आपलं रक्त मराठी माणसाचं आहे की नाही ते तपासावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं रक्त तुमच्या धमन्यांत असेल, तर तुम्ही असं एकमेकांवर टीका करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, पण आजचं संकट भयंकर आहे. कोरोना विरोधातील जी लढाई आहे, ही आमची एकट्याची लढाई नाही. आम्ही केंद्राच्या नेतृत्वात लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का ? असा सवालही राऊत Sanjay Raut  यांनी केला आहे.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले -‘असे आंडू-पांडू खूप आले’

Related Posts