नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायसरचे मोठे संकट आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच हजारो रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावरूनच खुद्द भाजपच्या bjp प्रवक्त्याच पंतप्रधान मोदींवर संतापल्या आहेत. ‘सुरक्षित अंतर ठेवा, घरात राहा. असे तुम्ही सांगत होता मग निवडणुका का घेतल्या? तुम्हीच हे पाळले नाही’, असेही त्या म्हणाल्या.
Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1384915708853817347
एका वृत्तवाहिनीवर वादविवाद चर्चा सुरु होत्या. त्यामध्ये भाजप bjp प्रवक्त्या रितू रावत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोदींनाच लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, ‘घरात राहा, सुरक्षित अंतर ठेवा. असे तुम्ही सांगत होता मग निवडणुका का घेतल्या? तुम्हीच हे पाळले नाही. गंगास्नान का करायला दिले? ऑक्सिजन नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत. या पृथ्वीवर माणसं शिल्लक नसली तर निवडणुकीचा काय फायदा? सरकार बनवले जाईल, निवडणुका होतील पण त्यासाठी एक वेळ द्या’. तसेच मला भाजप bjp प्रवक्तेपदावरून काढले तरी चालेल पण लोकं मरत आहेत. औषधांची किंमत वाढत आहे. याचा मला त्रास होत आहे’, असेही त्यांनी सांगितले.
… म्हणूनच FDA चे (आयुक्त अभिमन्यू काळेंच्या नियुक्तीला अजित पवारांचा होता विरोध
दरम्यान, बालमित्रांनी कोरोनाचे गांभीर्य पुन्हा एकदा पटवून द्यावे. घरात असे वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण, विनाकाम घराबाहेर पडता कामा नये. आपल्या लहानग्यांनी घरातील मोठ्या माणसांना स्वच्छता, अनुशासन यांचे महत्त्व पटवून दिले होते, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. त्यानंतर आता यावरून रितू रावत यांनी टीकास्त्र सोडले.
फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…
Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू
धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी
तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल