मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझे हे मौन कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे ह नेहमीच सोपे असते. पण सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटमधून त्यांनी सरकारवर टीका केली.
राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण वाढीवर बोलताना देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घातले आहेत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी बरेच काही करावे लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांना मदत करण्याची केंद्र सरकराची तयारी आहे. मात्र, राज्य सरकारच्या प्रयत्नांचे काय झाले हे आज सर्वांसमोर आहे. राज्यात केवळ रुग्ण वाढले नाही तर मृत्यूंची संख्या देखील वाढली. जगात सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाला आहे. एवढे होऊन ही टेस्टींगमध्ये अद्याप सुधार झालेला नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधता येत नाहीत, असे फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले.
कोरोनाच्या लाटेवरून मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…
देशाच्या कोरोना लढाईत राज्य अडचणीचे ठरले
राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना राज्य सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे ते एकमेव असे राज्य ठरले जे देशाच्या कोरोना लढाईत अडचणीचे ठरले आहे. कोरोना लढाईत आम्ही राज्य सरकारला मदत केली, त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय केंद्रीय चमू पाठवला आहे. ज्येष्ठ नागरिक या वर्गावारीत महाराष्ट्रात 25 टक्के लसीकरण झाले आहे. तर 4 राज्यांत हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. फ्रंटलाईन वर्कर्स या वर्गवारीत पहिला डोज देण्यात महाराष्ट्राने 73 टक्के लोकांचे लसीकरण केले, तर 5 राज्यात हे प्रमाण 85 टक्क्यांहून अधिक आहे. याच वर्गात दुसरा डोज महाराष्ट्रात 41 टक्के लोकांना दिला आहे. तर 6 राज्यांत हे प्रमाण 45 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती देवेंद्र फणवीस यांनी दिली.
Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’
ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमात सरकारने काय केले ?
महाराष्ट्राने आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ 41 टक्के लोकांना डोज दिला. तर दुसरीकडे 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी हे उद्दीष्ट 60 टक्क्यांहून अधिक गाठले. आता जो प्राधान्य क्रम ठरवून देण्यात आला आहे, त्यात सरकरने काय केले ? महाराष्ट्राने आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 86 टक्के लोकांना डोज दिले, तर दुसरीकडे 10 असे राज्य आहेत, त्याठिकाणी हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. लसीकरणाचा उद्देश हा आहे की, सर्वात प्रभावित गटातील मृत्यूदर कमी करुन त्यातून उर्वरीत घटकांना संरक्षण देणे. त्यामुळे आधी आरोग्य क्षेत्रातील आणि नंतर 45 वर्षापूढील सर्व घटकांची निवड केली, असे फडणवीस यांनी सांगितले.
🔟 आतापर्यंत मी गप्प राहिलो. पण, माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे हे नेहमीच सोपे असते. पण, सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2021
पण,राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले,याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत,तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे.टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रूग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2021
9️⃣महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2021
8️⃣गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली. केंद्रीय चमू पाठविल्या.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2021
6️⃣फ्रंटलाईन वर्कर्स या वर्गवारीत पहिला डोज देण्यात महाराष्ट्राने 73 % लोकांचे लसिकरण केले, तर 5 राज्यांमध्ये हे प्रमाण 85 टक्क्यांहून अधिक आहे.
याच वर्गवारीत दुसरा डोज महाराष्ट्रात 41 % लोकांना देण्यात आला, तर 6 राज्यांत हे प्रमाण 45 टक्क्यांहून अधिक आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2021
7️⃣ ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत महाराष्ट्रात 25 % लसिकरण झाले आहे. सुमारे 4 राज्यांत हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2021
चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !
परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार
‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार
पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित
आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’