मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’
मुंबई उच्च न्यायालयाने 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवले आहे. तसेच आता न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यावर संजय राऊत Sanjay Raut यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी यावर जास्त बोलणे टाळले. त्यामध्ये संजय राऊत म्हणाले, ‘न्यायालयाच्या निर्णयाचा सरकार अभ्यास करेल इतकंच मी सांगू शकतो. न्यायालयाचा निर्णय अद्याप माझ्या हातात आलेला नाही. न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही आणि मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही. त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल.’
‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’
दरम्यान, देशातील कोणतीही तपास यंत्रणा ही काही परमेश्वराचा अवतार नाही. ममता बॅनर्जी यांनीही काल केंद्रीय तपास यंत्रणेवर काही आरोप केले आहेत. त्यामुळे न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला आहे? ते आधी कळूदेत. त्यावर सरकारकडून भूमिका मांडली जाईल, असेही संजय राऊत Sanjay Raut यांनी सांगितले.
मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?
ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…
Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)
हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’