मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार आयोगाचे (Koregaon Bhima Inquiry Commission) कामकाज 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होत आहे. आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना साक्षीसाठी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी त्यांचे शपथपत्र आयोगासमोर यापूर्वीच दिले आहे. Koregaon Bhima Inquiry Commission
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये दंगल झाली होती. त्यातून जातीय तेढ वाढली होती.
त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमित मल्लिक (Sumit Mallik) आणि निवृत्त न्यायमुर्ती जे. एन. पटेल (Retired Justice J. N. Patel) यांचा चौकशी आयोग नेमला होता.
या कोरेगाव भीमा हिंसाचार आयोगाने (Koregaon Bhima Inquiry Commission) सर्वांकडून प्रतिज्ञापत्रे मागविली होती. त्यानंतर काही जणांचे साक्षीपुरावेही झाले होते.
फेब्रुवारी २०२० मध्ये सागर शिंदे (Sagar Shinde) यांनी आयोगासमोर अर्ज सादर करुन शरद पवार यांना आयोगाने चौकशीसाठी बोलवावे, अशी विनंती साक्ष देताना केली होती.
त्यावेळी आयोगाने शरद पवार यांनी आयोगाला शपथपत्र दिले आहे.
त्यांना साक्षीसाठी बोलविले जाईल, त्यावेळी तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारु शकता असे सांगितले होते.
त्यानंतर आयोगाने शरद पवार यांची साक्ष नोंदविण्याची तारीखही निश्चित करण्यात आली होती.
मात्र, त्यानंतर अचानक कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले.
तेव्हापासून आयोगाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर आता आयोगाचे कामकाज सुरु होत आहे.
Web Title : Koregaon Bhima Inquiry Commission to summon Sharad Pawar for witness; The work was halted due to corona
- Girish Chaudhary | ‘ईडीला सिडी लावू’ म्हणणार्या एकनाथ खडसे यांना मोठा ‘धक्का’ | जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी ED कडून ‘अटक
- 12 BJP MLA Suspended | ‘आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, त्यांच्याच हातात फुटला’, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- Sambhaji Brigade | छत्रपती संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्री करण्याची ‘ऑफर’, फक्त भाजपमधून बाहेर पडा !
- Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
- Shalinitai Patil । पवारांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप; शालिनीताई म्हणाल्या – ‘देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच’
- ED-सीबीआय चौकशीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘… तर विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले’