मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी काल (शुक्रवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी कोरोनाविषयी विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या टीकेचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. त्याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आरोग्यसेवक मिळत नसल्याचे म्हटले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यामागचे कारण सांगितले आहे.
‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला
मुख्यमंत्री ठाकरे Uddhav Thackeray यांनी महाराष्ट्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याचा इशारा दिला. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री म्हणाले, की आरोग्य सुविधा उभारण्याचे सल्ले दिले, आम्ही त्यावर काम करत आहोत. पण रोज किमान 50 डॉक्टर, आरोग्यसेवकांची सोय व्हावी. त्यावरून देशपांडे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘कोरोनाकाळात असे आरोग्यसेवक स्वत:हून सरकारला मदत करण्यासाठी आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सरकारने या सर्वांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे ते पुन्हा कामावर आले, तर सरकार त्यांना काढून टाकणार नाही, याची काय खात्री आहे? लोकांच्या मनातील तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नाहीत, असेही देशपांडे यांनी सांगितले.
CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…
दरम्यान, लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या लोकांमध्ये गरीब, स्थलांतरित मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊन हा रुग्णालये, आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी केला होता. आता पुन्हा त्यावर लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा सल्ला ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ चे आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरून ठाकरे Uddhav Thackeray सरकारला सल्ला दिला होता.
राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’
Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !
Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’
अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…
शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका