मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावरून याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’
On petition of Dr Jaishri Patil, Bombay HC asks CBI to start a preliminary inquiry within 15 days into corruption allegations of former Mumbai Police Commissioner Param Bir Singh against Maharashtra Home Minister Anil Deshmukh. pic.twitter.com/qfdQV1Pis7
— ANI (@ANI) April 5, 2021
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने जयश्री पाटील यांनी यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मला आनंद आहे. सीबीआयने प्राथमिक तपास 15 दिवसांत करायचा आहे. शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी अनिल देशमुख Anil Deshmukh कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत. अनिल देशमुख जर तुम्ही गृहमंत्री असाल आणि तुमच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलिस असतील तर तुम्ही योग्य तपास होऊ देणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार, सीबीआयला प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अनिल देशमुख Anil Deshmukh तुम्ही उद्योजकांना, सर्वसामान्यांना अशा पद्धतीने धमकावू शकत नाही. माझा जीव घेतला तरी मी लढत राहणार आहे, असेही जयश्री पाटील यांनी सांगितले. तसेच न्यायालयाने यावेळी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका कायद्याचे पालन न केल्याने रद्द केल्या, असेही त्यांनी सांगितले.
मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?
ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…
Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)
हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’