सरकारसत्ता ऑनलाइन टीम – एकेकाळचे भाजपवासी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी एक परिपत्रक काढत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांच्याशी मतभेद झाल्यानंतर गोटे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ( दि 23 मार्च रोजी ) पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटचा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर आता अनिल गोटे यांनी फडणवीसांवर निशाणा साधत त्यांच्यावर काही आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाले अनिल गोटे ?
आपल्या परिपत्रकात अनिल गोटे म्हणतात, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचं समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळं आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये म्हणून त्यांचं आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करत विरोधकांनाच नव्हे तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासठी फडणवीसांनी Devendra Fadnavis पोलीस यंत्रणेला कंस वेठीला धरलं अशा अनेक असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे.
मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी
‘कुठल्या मंत्र्यानं कसे पैसे घेतले हे मी फडणवीसांना सांगितलं’
आपल्या परिपत्रकात पुढं बोलताना अनिल गोटे यांनी कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. गोटे म्हणतात, देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीनं पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी Devendra Fadnavis त्यांना क्लीनचीट दिली असा घणाघाती आरोप गोटे यांनी केला आहे.
Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’
‘फडणवीस भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही’
आपल्या परिपत्रकात गोटे असंही म्हणाले की, फडणवीस Devendra Fadnavis भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकता तुम्ही केव्हाच गमवली आहे. उगाच नाक वर करून आणि लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचाही विश्वास ठेवत नाही असंही या पत्रकात नमूद केलं आहे.
खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?
सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस
ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका
फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल