मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेंव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची Shivrajyabhishek Din माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेंव्हाही काटा आला होता अन् आजही लिहताना येतो असा अनुभव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. तसेच पाटील यांनी शिवराज्याभिषेकानिमित्त Shivrajyabhishek Din रविवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक Shivrajyabhishek Din ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे.
खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती.
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी अन् रयतेसाठी शिवराज्याभिषेक दिन हा आनंदाचा दिवस.
याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा अरुणोदय झाला होता. त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक हा येणारे हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण असल्याचे पाटील (Jayant Patil) म्हणाले.
2019 मध्ये परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून झाली. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता.
म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली.
गाईडने गडाबाबत फार सखोल माहिती दिल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
Also Read:-
पुण्यात आता घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात, शहरात पहिलाच प्रयोग
कोलकातामध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब