नवी दिल्ली : वृत्तसंस्था- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे यांचा त्यामधील सहभाग आणि अटक, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा लेटर बॉम्ब, फडणवीस यांनी केलेले पोलीस बदली रॅकेट प्रकरण, या सर्व प्रकरणांवरुन विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. ठाकरे सरकारवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसताना आता थेट शरद पवार Sharad Pawar यांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका करताना थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. हा महाराष्ट्र शो नेमकं कोण चालवत आहे ?, शरद पवार देशमुखांना पाठिशी का घालत आहेत ?, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला. एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप सिंह यांनी केला. यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. विरोधकांच्या मागणीला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार Sharad Pawar यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली. त्यानंतर आता विरोधकांनी अनिल देशमुख यांच्यासोबत शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी’, संजय राऊतांचे मोठं विधान
रविशंकर प्रसाद यांचा शरद पवारांवर निशाणा
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, हा महाराष्ट्र शो नेमकं कोण चालवत आहे ? हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात कन्फ्युज सरकार आहे का ? या वसलू आघाडीची राजकीय दिशा काय आहे ? शरद पवार अनिल देशमुख यांना पाठिशी का घालत आहेत ? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी टीका केली. तसेच अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल, असा खोचक सल्लाही त्यांनी शरद पवार यांना दिला आहे.
The only way by which Sharad Pawar Ji's credibility can be restored is by making Anil Deshmukh resign: Union Minister and BJP leader Ravi Shankar Prasad pic.twitter.com/5AftFLQFHr
— ANI (@ANI) March 23, 2021
‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा
A 'khela' is happening in Maharashtra too. I just saw the Maharashtra ATS press conference, where only a statement was was made and no questions were taken…What's happening in Maharashtra is not 'vikas' it is 'vasooli': Union Minister & BJP leader Ravi Shankar Prasad, in Delhi pic.twitter.com/j3V86hGZXz
— ANI (@ANI) March 23, 2021
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, CM ठाकरेंवर केले ‘हे’ आरोप
Who is running the show of Maharashtra? Is it the most confused govt in the history of Maharashtra? What is the political direction of this 'vasooli' Aghadi? Sharad Pawar enjoys political credibility but under what compulsion is he defending Anil Deshmukh: RS Prasad, BJP pic.twitter.com/uZHs1EEMcB
— ANI (@ANI) March 23, 2021
‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका
खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार
रोहित पवारांनी भाजपला घेरलं !
‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला
त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप
‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?
वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी