नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर babasaheb ambedkar यांची यंदा 130 वी जयंती आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रासह काही राज्यामंध्ये 14 एप्रिल रोजी सुट्टी असते. मात्र, केंद्र सरकारने यंदाच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यावर्षीपासून देशातील सर्व सरकारी कार्यालये आणि औद्योगिक आस्थापनांना सार्वजनिक सुट्टी देण्यात येणार आहे.
सुप्रिया सुळेंनी चिमटा काढत केलं मोदी सरकारचं अभिनंदन !
डॉ. बी. आर. आंबेडकर babasaheb ambedkar यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतातील औद्योगिक अस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881 च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने देखील मागील वर्षी 14 एप्रिल हा राष्ट्रीय हॉलिडे जाहीर केला होता.
खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण
भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता.
निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !
डॉ. आंबेडकरांनी केलेले कार्य
दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, समाजासाठी असीम त्याग करणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा अनेक गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात केल्या.
बाबासाहेबांचा जन्म कोठे झाला ?
बाबासाहेब babasaheb ambedkar यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. बाबासाहेब यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे भीमाबाई होते. मध्य प्रदेशानंतर ते काही काळ दापोली, सातारा येथे वास्तव्यास होते. त्यानंतर आंबेडकर कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत झाले. शिक्षण घेण्यासाठी त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. वयाच्या 14-15 वर्षी त्यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांची मुलगी म्हणजेच रमाबाई यांच्यासोबत झाला. शालेय जीवनात बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते.
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान
शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’
पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “
‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश
लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला
‘आधी बुडणार्या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’
‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’
एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..
परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा