मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) वाद वाढत चालला आहे. एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) भाजपच्या नेत्यांवर देखील निशाणा साधला जात आहे. शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन आता शिवसेनेचे (Shivsena) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. अकोला येथे शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) बोलत होते.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना लालकृष्ण आडवाणी (LK Advani) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या बैठकितला किस्सा सांगितला. मुंबईच्या महापौर बंगल्यावर (Mumbai Mayor’s Bungalow) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत आडवाणी बाळासाहेबांना म्हणाले की, बाळासाहेबजी, एक गंभीर समस्या आहे. आम्ही ठरवलं आहे की, मोदींना हटवायचं आहे. यावर काय म्हणता? मोदींना हटवणार? मोदी गेले, तर गुजरात गेला, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं, अशी आठवण सावंत यांनी सांगितली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आडवाणी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना
(Atal Bihari Vajpayee) फोन करुन सांगितलं की, मोदींना हटवू नका,
असं अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना (Shivsainik) संबोधित करताना सांगितले.
आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र त्यावेळी बाळासाहेबांनी वाचवलं नसतं ना,
तर मोदी आज कुठल्या गल्लीत पडलेत, हे कुणाला कळलंही नसतं, अशी टीका त्यांनी केली.
तसेच बाळासाहेबांच्या या उपकाराची फेड तुम्ही कशी करत आहात? असा सवाल सावंत यांनी केला.
Web Title :- Arvind Sawant | shiv sena leader arvind sawant has criticized prime minister narendra modi
Pumpkin Seeds | टाकाऊ समजून डस्टबिनमध्ये टाकू नका भोपळ्याच्या बिया, अन्यथा मिळणार नाहीत फायदे
Diabetes आणि Heart च्या पेशंटने करावे ‘या’ पाण्यातील वनस्पतीचे सेवन, आरोग्याचे टेन्शन होईल दूर
MNS Chief Raj Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…