पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Chandrakant Patil | भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने काल (रविवारी) पुण्यात कार्यकर्त्याच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते. त्यावेळी पाटील यांनी अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं गूढ सांगितलं आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘बूथ हा शब्द अमित शाह यांनी दिला. ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना कुणाला झोपून
देत नव्हते. ज्या आसाममध्ये (Assam) अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे तो आसाम हातातून जाईल असं वाटत होतं. तो आसाम बूथ संपर्क
योजनेमुळे आसाममध्ये एकदा नाही तर दोनदा विजय मिळाला. ज्या ईशान्य भारतातील सेवन सिस्टर स्टेट राज्ये ख्रिश्चनीकरणामुळे हातातून जातील असं
वाटत होतं त्यातील त्रिपुरासह, नागालँड, मिझोराम, मेघालयातही सरकार आलं. ही किमया तुम्ही आम्हाला शिकवली. आता आम्ही कुणाला सोडत नाही,
असं पाटील म्हणाले.
दरम्यान. पुढे पाटील म्हणाले, 2014 मध्ये पहिल्यांदा असं झालं की भाजपा सोडून कुणालाच 100 चा आकडा पार करता आला नाही. हे देखील बूथ
योजनेमुळेच झालं. हे एकदाच झालं नाही, तर 2019 मध्ये देखील तसंच झालं. त्यावेळी धोका देऊन सरकार बनलं नाही, पण 105 आमदार निवडून
आले. त्याआधी 2014 मध्ये 122 आमदार निवडून आले.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update
Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil comment on strategy of home minister amit shah for bjp
victory in assam