नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या हल्ल्यावरून तृणमूलने भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे, तर भाजप आणि कॉंग्रेसने बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला खोटा असून, त्यांचा निवडणुकीचा ड्रामा असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी adhir ranjan chaudhary यांनी बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी हे हल्ला झाल्याचे ढोंग करत आहेत. हल्ला झाला त्यावेळी मुख्यमंत्र्यांची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अचानक कोठे गेली होती? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
बंगालमध्ये परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी आता स्वत:वर हल्ला करण्याचे नाटक करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रय़त्न करत आहेत, असे चौधरी adhir ranjan chaudhary यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय, सीआयडी किंवा इतर कोणत्याही एजन्सीमार्फत चौकशी करावी, असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था अचानक कोठे गेली होती? असा सवाल उपस्थित करत संपूर्ण भागात सीसीटीव्ही आहेत. जेव्हा चौकशी होईल तेव्हा ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. याशिवाय, थोडी फार जखम कोणालाही चालता-फिरता होते, ममता बॅनर्जी फक्त ढोंग करत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपला इशारा दिला आहे. रविवारी 2 मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा, असे त्यांनी म्हटले आहे.
‘बंगालच्या लोकांची ताकद…’, ममतांचा ‘तो’ फोटो पोस्ट करत भाच्याचा BJP ला इशारा