मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी त्यांची पाठराखण करत सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरूनच आता भाजप नेते सुनिल देवधर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ नंतर शरद पवार Sharad Pawar यांनी पत्रकार परिषद घेत देशमुखांवरील आरोपांचे खंडन केले. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्पष्टीकरणावर वक्तव्य केले. त्यानंतर आता सुनिल देवधर यांनी विधान केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे. अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले. उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची. करावे तसे भरावे’.
शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे, अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले.
उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची.
करावे तसे भरावे! pic.twitter.com/8yZ0TdFEsL
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) March 23, 2021
‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी’, संजय राऊतांचे मोठं विधान
दरम्यान, राज्यातील पूजा चव्हाण प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण, सचिन वाझे प्रकरण आणि आता माजी पोलिस आयुक्तांचे पत्र या सर्व गोष्टींमुळे ठाकरे सरकारवर विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता देवधर यांनी थेट पवारांनाच Sharad Pawar लक्ष्य केले. उतार वयात इतकी बेइज्जती कोणाची होऊ नये, असे म्हटले आहे.
‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका
खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार
रोहित पवारांनी भाजपला घेरलं !
‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला
त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप
‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?
वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी
‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा