IMPIMP

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

by pranjalishirish
bjp mp udayanraje bhosle on sambhaji bhide statement over coronavirus

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन- कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहात का ? अशी विचारणा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले UdayanRaje Bhosle  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर विचारण्यात आले. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले UdayanRaje Bhosle म्हणाले, माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारु नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करुन बोलतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजे UdayanRaje Bhosle यांनी दिली आहे.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

काय म्हणाले संभाजी भिडे ?

देशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे. लोक स्वत:च्या आरोग्याबाबत पाहून घेतील. सरकारने या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. हातावरती पोटं असलेली किती लोकं या लॉकडाऊनमध्ये मेली. किती लोक बेरोजगार झाले. याची फिकीर कोणाला नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना लाठीने मारले जाते आणि दारुच्या दुकानात गर्दी करणाऱ्यांना सोडले जाते. सर्व व्यापार बंद ठेवून दारुची दुकाने सुरु ठेवता, हा काय प्रकार आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिले पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही.

संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले -‘असे आंडू-पांडू खूप आले’

देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनची गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्या, आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा. दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट, आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही. व्यायाम करायचा नाही हा महामुर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही.

विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले – ‘राज्यात Weekend ऐवजी 3 आठवड्यांचा कडक Lockdown करावाच लागेल’

कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवर मास्क लावण्याचा हा नालायक सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही. मास्क नसेल तर पोलीस काठी मारतात. हा सगळा मूर्खपणा आहे. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का, जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असेही संभाजी भिडे म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Related Posts