IMPIMP

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

by pranjalishirish
maharashtra cm uddhav thackeray nashik police academy convocation ceremony coronavirus online fraud

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – कोरोना (COVID-19) चा विषाणू जसा आपले रूप बदलतो आहे, त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे तसंच काहीसं आता रूप बदलणारी गुन्हेगारी आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या 118 व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर रहावेच लागेल अशी सूचनाही ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

‘आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत’

उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray म्हणाले, खडतर प्रशिक्षणानंतर आपण एखादी गोष्ट कमावतो त्याचा आनंद मोठा असतो. आजचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अंगावर रोमांच येतात. भारावून जाणारा समारंभ असतो. शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात असतो. आज मात्र मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागतो. पोलीस दलाचं हेच वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचं पालन करत आहोत. आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत. आपले शूर जवान गडचिरोलीत सुद्धा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करत आहेत. त्यांना टिपत आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत आहेत असं म्हणत ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘कारण पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो, केलं तर का केलं आणि नाही केलं तर का नाही’

पुढं बोलताना ठाकरे म्हणाले, एका बाजूला नक्षलवादाचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोनाचा मुकाबला करत आहेत. दिसणाऱ्या शत्रुवर तुटून पडता येतं, पण ही शस्त्र कोरोनाविरोधात चालत नाहीत. कारण तो न दिसणारा शत्रु आहे. पण हे आव्हानही पोलिसांनी स्विकारले आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत. प्रशिक्षणार्थींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. या 13 महिन्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी सदृढ शरीर कमावलंच आहे. परंतु निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरतं. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात त्यात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन आस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावं लागतं. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणासोबतच प्रसंगावधान बाळगावं लागतं. कारण पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केलं तर का केलं आणि नाही केलं तर का नाही. त्यामुळं खडतर प्रशिक्षणातून मनशक्ती मिळवावी लागते. त्यासाठी इच्छाशक्तीही महत्त्वाची ठरते असंही ठाकरेंनी सांगितलं.

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

‘कोरोनाचा सेकंड म्युटंट आलाय, तसंच काहीसं आता रूप बदलणारी गुन्हेगारी आली आहे’

उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray म्हणाले, तुम्ही एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नातल्या जगात पहिलं पाऊल टाकत आहात तेही निधड्या छातीनं. कोरोना विषाणू जसं आपलं रूप बदलतो, त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे. तसंच काहीसं आता रूप बदलणारी गुन्हेगारी आली आहे. गुन्हेगारी क्षेत्राचं हे आव्हान आता ऑनलाईन आणि त्या स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढू लागलं आहे. बँकिंगमधील ऑनलाईन गुन्ह्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाईन असले तरीही त्या गुन्हेगारापर्यंत पोहचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालाव्या लागणार आहेत.

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘जल्लोष होणारचं, परंतु बेहोश होऊन चालणार नाही, जोश आणि होश यांचं तारतम्य बाळगावं लागेल’

उद्धव ठाकरे असंही म्हणाले, खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारचं. परंतु बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचं तारतम्य बाळगावं लागेल. त्यासाठी भानावर रहावंच लागेल. प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय अधीरतेनं तुमची वाट पहात आहेत. पण आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबीयांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचं कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्रचं स्वप्न मिसळून पहावं लागणार आहे. तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावं लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासानं येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल असा मला विश्वासही आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या या परिवारात तुमचं स्वागत. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकीर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल अशी अपेक्षाही ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Also Read:

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Related Posts