मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कोरोना Corona लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा तुटवडा यांवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
कोरोना, Corona मिनी लॉकडाऊन, व्यापार, सचिन वाझे लेटर, अंबानींच्या घरासमोरील स्कार्पिओ कार, यासह अनेक विषयांवर भाष्य केले. राज्यात मिनी लॉकडाऊन केल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. राज्यातील एकही जिल्हा नाही, जिथे व्यापारी रस्त्यावर उतरले नाहीत. दुसरीकडे दुकानदारांकडून वसुली सुरू असल्याचा आरोपही राणेंनी केला. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच, भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच, मीनी लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उतरलेल्या व्यापाऱ्यांचेही होत असेलेल हाल सांगितले. जी व्यक्ती कुटुंबं सांभाळू शकत नाही, ती व्यक्त कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार, असा सवाल राणे यांनी केला आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणावरूनही नारायण राणे यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली, राणे यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’
“जुहूमधील एका दुकानात महापालिकेचे अधिकारी गेले, त्या दुकानात ३ माणसं होते म्हणून १० हजार रुपये दंड घेतला. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून नीटनेटका धंदा नाही, दिवसभरात एक रुपयाचेही गिऱ्हाईक नाही. पण, १० हजार रुपयंचा दंड भरावा लागला, असे राणेंनी सांगितले. तसेच, जर व्यापाऱ्याला १० हजार रुपयांचा दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती दंड? असा प्रश्नही राणेंनी विचारला. पंढरपुरात बैठक होती, अर्थमंत्र्यांना मग का नाही नोटीस?,”असा प्रश्नही राणेंनी विचारला आहे.
संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले -‘असे आंडू-पांडू खूप आले’
“महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. करोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही. जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे, रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे, त्यांना बरं करणे ही तुमची तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, मग कोरोना Corona होईल कसा,” असा रोखठोक सवाल नारायण राणे यांनी केले आहेत.
Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले
“राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय,” असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.
गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु
MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल
Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !
Lockdown चा कालावधी एक आठवड्यांनी वाढणार ? सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत ?