नवी दिल्ली : Rahul Gandhi देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यातच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी Rahul Gandhi भापज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ‘ज्योतिरादित्य यांनी वेगळा रस्ता निवडला नसता तर ते मुख्यमंत्री नक्कीच बनले असते’.
Shri @RahulGandhi attends the @iyc National Executive meeting and interacts with the leaders & members of the Youth Congress. pic.twitter.com/ljQoXul6PC
— Congress (@INCIndia) March 8, 2021
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर राहुल गांधी Rahul Gandhi बोलत होते. ते म्हणाले, की ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली नसती तर आज ते मुख्यमंत्री बनले असते. मात्र, आता ते भाजपमध्ये बॅकबेंचर बनले आहेत. शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मिळून काम करून संघटनेला मजबूत करण्याचा पर्याय होता. त्यासाठी मी त्यांना म्हटलेही होते. तुम्ही एकेदिवशी मुख्यमंत्री बनाल. पण त्यांनी वेगळा रस्ता निवडला, अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते.
दरम्यान, आता हे लिहून घ्या त्यांना भाजप कधीही मुख्यमंत्री बनवणार नाही. त्यांना परत यावं लागले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरएसएसच्या विचारधारेने लढणे आणि कोणालाही न भ्यायचा हल्ला दिला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !