नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. पण या तिन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे भेट झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले.
गुजरात येथील वर्तमानपत्रांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘अमित शहा आणि शरद पवार Sharad Pawar यांची भेट झाली असली तरी त्यामध्ये गैर काय आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री असल्याने आम्हीही भेटू शकतो. अशा बातम्या सार्वजनिक करता येत नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘गुप्त काहीच राहत नाही. बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही. सार्वजनिक होत असतात’.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील टीकेवर बोलताना राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राला देशात वेगळीच प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्राचे नाव देशात खराब झाले आहे. यांसारख्या घटनांवरून महाराष्ट्र बदनाम झाला आहे. ते व्हायला नको होते’.
लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !
महाविकास आघाडी सरकार स्थिर
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे काम उत्तम सुरु आहे. विरोधकांकडून जे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याची संधी विरोधकांना देऊ नये, असे मला वाटते. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, पुढील साडेतीन वर्षे विरोधकांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत, असेही ते म्हणाले.
जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल
खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !
शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’
निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !
माजी खासदाराचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला, म्हणाले – ‘महाराष्ट्राची वाट लावू नका’
Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही
Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’
‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’