मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. तसेच संजय राठोड यांचा राजीनामा, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा या सर्व घडामोडीनंतर आता ठाकरे सरकारमध्ये Thackeray government फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. हे बदल शिमग्यानंतर केले जाणार असल्याची शक्यता आहे.
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नेतेमंडळींवर भाजपकडून टीका होत आहे. Thackeray government भाजपच्या आक्रमक आरोपांमुळे महाविकास आघाडीत बिघाड होऊन आता राज्य मंत्रिमंडळाचा फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्यात सव्वा वर्षापुर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी भाजप सरकारने नियुक्त केलेले समर्थक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (IPS) कार्यरत होते. मात्र, आता या सर्व समर्थक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्य सरकारची Thackeray government खालावत चाललेली प्रतिमा उंच करण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार, मंत्रिमंडळात फेरबदल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा
फडणवीसांचा अजूनही गृह विभागावर वचक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील माहिती जारी केली होती. त्यानुसार त्यांनी गृहमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे काम केले. विरोधी पक्षनेते असूनही फडणवीस यांचा गृह विभागावर आजही किती वचक आहे हे यातून दिसत आहे.
PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर
Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल
‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य
मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…
परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी