नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर आता नुकतेच भाजपला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा Yashwant Sinha यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली. ‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला 294 पैकी 300 जागांवर विजय मिळेल’, असे ते म्हणाले.
We are grateful to the Home Minister for conservatively claiming BJP's victory on only 26 seats out of 30 in the first phase of Bengal elections. My information is that it is winning all the 30 and a total of 300 seats out of 294.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) March 30, 2021
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर बंगालमध्ये भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा केला होता. त्यावरूनच यशवंत सिन्हा Yashwant Sinha यांनी त्यांच्यावर टीका करत हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने 30 पैकी 26 जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. पण माझ्या माहितीप्रमाणे भाजप संपूर्ण 30 आणि 294 पैकी 300 जागांवर विजय मिळवेल’.
शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…
दरम्यान, भाजपचे खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनीही भाजपला ‘घरचा आहेर’ देत टीका केली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते, की ‘पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे हे आता विसरून गेले पाहिजे’. त्यानंतर एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपला आता लक्ष्य केले आहे.
केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’
सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण
अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार
‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’
शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’
चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट