मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील 18 वर्षावरील सर्व वयोगटांचे लसीकरण (Vaccination) मोफत करण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून (pantpradhan garib kalyan yojana) देशभरातील 80 कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय स्वागतर्ह असल्याचे मत केंद्रीय समाजिक राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानांचा आदर्श घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारनंही (Mahavikas Aghadi government) राज्यातील गरिबांना मदत करावी, असा सल्ला दिला.
18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतलाआहे. या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे.महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना त्वरित मदत करावी.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 8, 2021
–
टीका करणाऱ्यांचे तोंड बंद
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचं कौतुक करणारं एक ट्विट रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे.
या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर (State Government) निशाणा साधला आहे.
18 वर्षावरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे.
या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे.
महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील (Maharashtra) गरिबांना त्वरित मदत करावी, असे आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ताळमेळ नसलेले व गोंधळलेले सरकार
दरम्यान, नवी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी,
राज्यातील ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु असून मंत्री एक विधान करतो,
तर दुसरा दुसरे बोलतो. त्यामुळे ताळमेळ नसलेले व गोंधळलेले हे सरकार आहे.
या सरकारच्या कामावर आम्ही समाधानी नाही,
अशी टीका केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती.
Also Read:
9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार
जितेंद्र आव्हाडांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई’
Pravin Darekar | ‘आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात ?’
‘ही राजकीय बैठक नव्हती’ ! मुख्यमंत्र्यांचे ‘शरीफ’ उत्तर, लगावला ठाकरी टोला (व्हिडीओ)