ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – भारत-पाकिस्तान (India-Pakistan Cricket Match) सारखाच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो…, अशी शाब्दिक आतषबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. यंदा शिंदे गटाकडून ठाण्यात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, दिवाळीबरोबच काल भारताने पाकिस्तान विरुद्ध जो सामना जिंकला, त्याचा आनंदही आपण आज साजरा करत आहोत. तुम्ही टीव्हीवर बघितले असेल तर, काल मेलबर्नच्या मैदानातही आपली बाळासाहेबांची शिवसेना झळकली होती. कालचा सामना जसा जिंकला, तसाच सामना आम्ही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्राने, देशाने बघितला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
मुख्यमंत्री म्हणाले, लोकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला.
त्यामुळे आम्ही सत्तेत येताच, आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली.
खरे सांगायचे तर विकासाबरोबर या गोष्टीही आवश्यक आहेत.
माणसाचे मन प्रसन्न असेल, तर त्याला पुढे जाता येते. या राज्यात आता एक परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे.
आज मी ज्या ठिकाणी जातो, तिथे उत्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो.
या गोष्टींचे समाधान आणि आनंदही वाटतो. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आले.
Web Title :- CM Eknath Shinde | ekanath shinde speech in diwali pahat program in thane
Pune Crime | कात्रज परिसरातील मांगडेवाडीतून 10 लाखांचा चरस जप्त, तस्कराला अटक