पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis | महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक कारणावरुन आरोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते भाई जगताप (Congress leader Bhai Jagtap) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi government) कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं,’ असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
भाई जगताप म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल हे सर्व केल्याचा पश्चाताप फडणवीस (Devendra Fadnavis) यांना झालाय. फडणविसांच्या 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या दावणीला बांधला. मुंबईसारख्या ठिकाणी नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) खुश करण्यासाठी त्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं. त्याचा पश्चाताप देडणवीसांना व्हायला हवा. असं ते म्हणाले.
पुढे बोलताना भाई जगताप म्हणाले, ‘राज्यात जेव्हा आघाडी सरकार होते.
तेव्हाही आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो. यात नवीन काही नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा विषय आम्ही स्थानिक नेत्यांवर सोडतो.
मुंबईत एकटे लढण्याचा निर्णय हा स्थानिक नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे.
आमची ही भूमिका राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कळवलेली आहे.
आमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी बिघाडी होणार असे काही नाही,
असंही भाई जगताप (Congress leader Bhai Jagtap) म्हणाले.
Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis ruined 5 years not developed maharashtra said congress leader bhai jagtap
Pune NCP | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप
Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…