सरकारसत्ता ऑनलाइन – IND vs SA 2nd T20 | विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही वर्षांपासून आपल्या चांगल्या फॉर्मसाठी झगडताना दिसत होता. त्यामुळे त्याला अनेक लोकांकडून टीकादेखील सहन करावी लागली होती. मागच्या तीन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नव्हते. यानंतर थांबेल तो विराट कुठला. विराटने अनेकवेळा आपल्या खेळीने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
या आशिया चषकात (Asia Cup) विराट आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. या आशिया चषकात विराट कोहलीच्या नावावर अधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड झाला आहे. तसेच त्याने तीन वर्षानंतर एक शतक ठोकले आहे. त्यामुळे त्याच्या या शतकाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. विराट आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्यामुळे आगामी T- 20 वर्ल्ड कपसाठी (T-20 World Cup) भारताला मोठा फायदा होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा त्याने आपला फॉर्म कायम राखत चांगली कामगिरी केली होती. (IND vs SA 2nd T20)
T20 सामन्यात 11 हजार धावा पुर्ण
काल टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना गुवाहाटीत पार पडला.
या सामन्यात विराटने 28 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 49 धावाा काढल्या.
कालच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे लक्ष ठेवले.
कालच्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली.
त्याने T-20 सामन्यांमध्ये 11 हजार धावा पुर्ण केल्या आहेत.
T20 सामन्यामध्ये सर्वात अधिक धावा करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील चौथा खेळाडू बनला आहे.
Web Title :- IND vs SA 2nd T20 | a new record in the name of virat after hitting a towering six marathi news
Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक
Pune Crime | सिक्युरिटी गार्डनेच केली सोसायटीच्या सभासदाला मारहाण; पिसोळी येथील घटना